--------------------------------------------------------------------------------------------------------------------------" जिजाऊ "
राजमाता जिजाबाईचे माहेर बुलढाणा जिल्ह्य़ातील सिंदखेड.
जाधव कुटूंब देवगिरी येथील यादव घराण्याचे वंशज .
राजमाता जिजाबाईचा विवाह 1605 साली शहाजीराजा सोबत झाला. जिजामाताना ऐकुन 8 मुल, त्यात 6 मुली आणी 2 मुले.
छञपती शिवराय हे लहानाचे मोठे आपल्या आईच्या छञछायेखाली झाले. शिवरायांची संपुर्ण जबाबदारी ही जिजामातानी स्वता :उचलली. आणि त्याना उत्तम संस्कार दिले.
जिजामाता राजकारणातही लक्ष देत.आणी प्रसंगी योग्य निर्णय ही करत. त्या बरोबर प्रजेवर लक्ष ही देत होत्या. आणी शिवरायांकडे बारकाईने लक्ष सुध्दा असे.शिवाजी महाराजाना कर्तुत्ववान योध्द च्या गोष्टी सांगणे. शस्त्र विदयेत त्याना निपुण करताना दादोजी कोंडदेव बरोबर स्वत:ही लक्ष देऊन मार्गदर्शन करीत.
शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार करून कर्तव्य आणी राजनिती चे धडे ही शिकवले. आपल्या मनात असलेले हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यानी महाराजाकरवी पुर्ण केली .त्यासाठी त्यांनी तसे संस्कार, ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम असे सर्वगुणाचे बाळकडू हे शिवरायांना देणारी माता जिजाबाईना शतशः नमन .
ज्यांच्या श्रमाने आणि शिवरायांच्या पराक्रमाने हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात आले. त्या जिजाऊ, राजमाता जिजाबाई